Wednesday, 29 March 2023 / Published in Articles

मागच्या भागात आपण परदेशातील विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी इंग्रजी भाषा आणि त्याचे मानांकन कसे महत्त्वाचे आहे हे पहिले.

1) International English Language Test System

जगभरातील बहुतेक विद्यापीठांमध्ये ही स्वीकारली जाते. अमेरिकेतील जवळजवळ ३,४०० विद्यापीठांसह ब्रिटन, ऑस्ट्रेलियामध्ये, कॅनडा, आयर्लंड आणि युरोपमधील बहुतेक सर्वच विद्यापीठांमध्ये या चाचणीचे मानांकन स्वीकारले जाते. या परीक्षेत तुमचे इंग्रजी भाषा ऐकण्याबरोबर, बोलण्याचं, लेखन आणि वाचन कौशल्यांचे मूल्यमापन करण्यासाठी एक परिक्षा स्वरूप तयार केले आहे. मूळ इंग्रजी वक्त्यांच्या माध्यमातून त्याची बोलली जाणारी भाषा ऐकवली जाते आणि नंतर चाचणीच्या शेवटी त्याबद्दल प्रश्न विचारले जातात. या परीक्षेला जास्तीत-जास्त १० मानांकन स्कोअर असतो. यापैकी आपल्याला परीक्षेत विद्यापीठाला अपेक्षित असलेले मानांकन गुण मिळवणे अपेक्षित असते. बहुतांश विद्यापीठांना किमान ५.५ किंवा त्याहून अधिक मानांकन गुण अपेक्षित असतात. ही चाचणी २ तास आणि ४५ मिनिटांचा असतो. ती दिल्यानंतर याचा निकाल परीक्षा दिलेल्या तारखेपासून १३ दिवसांनी दिला जातो.

2) Test of English as Foreign Language (TOEFL)

इंग्रजी भाषा कौशल्ये मोजणारी ही सर्वांत पसंतीची परीक्षा आहे. याला TOEFL iBT म्हणून देखील ओळखले जाते जेथे iBT म्हणजे इंटरनेट-आधारित चाचणी. अमेरिका आणि कॅनडामधील विद्यापीठे मोठ्या प्रमाणावर ही चाचणी स्वीकारतात आणि याचबरोबर १५० देशांमधील ११ हजार शैक्षणिक संस्थांमध्ये ही चाचणी लोकप्रिय आहे. या चाचणीमध्ये वाचन आणि ऐकण्याचे कौशल्य मोजण्याची प्रक्रिया वेगवेगळ्या कालावधीसह IELTS चाचणी सारखीच असतात. या चाचणीसाठी स्कोअर ० ते १२० असा असतो. तुम्ही ९० ते १००च्या दरम्यान स्कोअर केल्यास तुम्ही पात्र समजले जाता. या चाचणीमध्ये उपश्रेणी आहेत आणि अनेक विद्यापीठांमध्ये प्रत्येक उपश्रेणीसाठी त्यांचे किमान मानक गुण मिळवणे अपेक्षित असते. ही चाचणी Education Testing Service (ETS) यांच्या माध्यमातून घेतली जाते. या चाचणीचा कालावधी ३ तास असतो. परीक्षा दिल्याच्या तारखेपासून ६ दिवसांनी या चाचणीचा निकाल येतो.

3) Pearson Test of English (PTE)

ही चाचणी देखील संगणक आधारित परीक्षा आहे. ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडसह अनेक देश या चाचणीचे मानांकन स्कोअर स्वीकारतात. तुमच्या ऐकण्याच्या कौशल्याचे मूल्यमापन करण्याची पद्धत IELTS आणि TOEFL चाचण्यांसारखेच असते. कथन कौशल्य, निबंध लेखन इत्यादी बाबींच्या आधारे बोलणे आणि लेखन कौशल्यांचे मूल्यांकन केले जाते. या चाचणीमध्ये १० ते ९० स्कोअर दिला जातो, यापैकी किमान ५८ किंवा त्यापेक्षा जास्त पीटीई स्कोअर तुम्हाला बहुतेक विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पात्र असेल. या चाचणीचा कालावधी हा ३ तास असतो. परीक्षा दिल्याच्या तारखेपासून २ दिवसांनी ऑनलाइन पद्धतीने निकाल घोषित केला जातो.

काही विद्यापीठांमध्ये तुम्हाला इंग्रजीची ही परीक्षा द्यावी लागत नाही, त्यासाठी तुमचं पदवीच किंवा पदवी उत्तर शिक्षण भारतात इंग्रजी मधून झाला आहे यासाठीच ‘मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन’चे सर्टिफिकेट सादर करावे लागते. वर नमूद केलेल्या तिन्ही चाचण्यांमधील मिळालेले गुण दोन वर्षांसाठी वैध असतात.

Wednesday, 15 March 2023 / Published in Articles

पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते.विद्यार्थ्यांनी काही ठराविक गोष्टींचा विचार पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यापीठ निवडताना करावा. याबाबत आजच्या लेखात थोडीशी नजर टाकू.

अभ्यासक्रम आणि कोर्सचा आराखडा

शिक्षणानंतर पुढील करिअरच्या उद्दिष्टांशी संलग्नित असणारा अभ्यासक्रम आणि त्या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने कोर्सच्या आराखड्यात काय समावेश केला आहे? तो निवडलेला कोर्स आपल्याला अपेक्षित कौशल्ये आणि ज्ञान समाविष्ट करणारा आहे का? या गोष्टी बारकाईने पहाव्यात.

Wednesday, 25 January 2023 / Published in Articles

महत्त्वाकांक्षी व्यक्ती, चांगला विद्यार्थी बनण्यासाठी आपला जास्तीत जास्त वेळ ज्ञान मिळवण्यासाठी आणि इच्छित क्षेत्रातील आवश्यक कौशल्ये प्राप्त करण्यासाठी गुंतवणे आवश्यक आहे. वेगवान बदलत जाणाऱ्या करिअर संधी प्राप्त करण्यासाठी आपण अधिक कार्यक्षम असावं. यासाठी महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात मिळणाऱ्या वेळेचा प्रत्येक क्षण कौशल्य सुधारण्यासाठी देणे अपेक्षित आहे. जागतिकीकरणाच्या बहुआयामी विश्वात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी, आपल्याला ‘जग कसे कार्य करते’ हे समजून घेणे आवश्यक आहे. आपण बनवलेल्या स्वतःच्या परिमितीच्या बाहेर विचार करणे आणि वेगवेगळी मूल्ये आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिकतेच्या लोकांना समजून घेणे आवश्यक आहे. परदेशात भिन्न संस्कृतीतील विद्यार्थ्यांसोबत शिक्षण घेणार असल्याने बहुआयामी दृष्टी परदेशी शिक्षण घेण्यासाठी महत्त्वाची आहे.

Wednesday, 04 January 2023 / Published in Articles

भारताचा इतिहास रंजक आहे. एक काळ असा होता की, शिक्षण ही गोष्ट काही ठराविक आणि मूठभर लोकांसाठीच उपलब्ध होती. त्याकाळी सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, फातिमा शेख याच बरोबर छत्रपती शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या महामानवांनी वंचित-बहुजन घटकांतील लोकांसाठी शिक्षण उपलब्ध व्हावे आणि सर्व स्तरातील लोकांना शिक्षणाचे हक्क मिळावे यासाठी आयुष्य वेचले. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये युवकांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी धडपड सुरू होती, त्या काळात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भारतामध्ये, बहुजन मुलांसाठी शैक्षणिक संधी उपलब्ध होण्यासाठी रयत शिक्षण संस्था उभारली.